भ....भ....भ......भागमती !
काही दिवसांपूर्वी बायकोसोबत अनुष्का शेट्टीचा तमिळ "भागामती" पाहिला. हो तीच बाहुबली मधली देवसेना. तर चित्रपटात भागमती नावाच्या राणीचं भूत नायिकेला झपाटत आणि ते अतिशय सुंदररीत्या अनुष्काने रंगवलय. काही दृश्य तर खरोखरच अंगावर काटा आणतात. पण शेवटी कळत हे सर्व नायिकेचं नाटक असतं तिच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी आणि तीही आईएएस असूनही तिला या असल्या आत्मा भूत वगैरे मार्गाने जाणं कसं योग्य वाटत काय माहीत?
पण प्रश्न माझा नाही. पूर्ण सस्पेंस चित्रपट एन्जॉय करणाऱ्या बायकोला शेवट झाल्यावर चित्रपट नाही आवडला. कारण काय तर ते भूत वगैरे खरं असायला हवं होतं, ते नसल्यामुळे सर्वी मज्जा गेली असं तिचं म्हणनं. नंतर पण काही लोकांनी हीच प्रतिक्रिया दिली.
कसयं ना आपल्याला देव भूत वगैरे या गोष्टींची एवढी सवय लागलीय की ज्या गोष्टींचं उत्तर नाही त्या गोष्टीला देव किंवा भूतचं कारणीभूत ही समज झालीयं. म्हणून तर नागिण, रात्रिसं खेळ चाले यांसारखे सीरियल आजही हमखास डिमांड मध्ये आहेत आणि लोकंही आवर्जून पाहतात. एक मनोरंजन म्हणून आपण काल्पनिक काहीही पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण स्पाइडरमन किंवा हैरी पॉटर सारखे सिनेमे पाहतो, पण आपण त्याला सत्य म्हणून स्वीकारत नाही.
इथे मात्र गावोगावी गल्लोगल्ली असणाऱ्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातं. लोक त्या गोष्टीशी एकरूप व्हायला लागतात, त्या गोष्टींशी मिळत्याजुळत्या (किंवा मिळवून जुळवून) कहाण्या उकरल्या जातात, रंगवल्या जातात आणि हेच मुळी भयानक आहे.
2 चा दूसरा घात 4, तिसरा घात 8, चौथा घात 16, आणि अनंतव्हा घात देव. ज्या गोष्टीचं उत्तर माहीत नाही त्याचं उत्तर राम जाने. (किमान जोपर्यंत शास्त्रज्ञ शोधून काढत नाही तोपर्यंत तरी देवचं)!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा